लोकसत्ता टीम

वर्धा: आज पहाटे झालेल्या मुसळधार वृष्टीने चित्रच पालटले.विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा शेतपिकांचे मोठे नुकसान करणारा ठरला. आंबा मोहोर गळून पडला. कापणीला आलेल्या गहुपिकाचे प्रामुख्याने नुकसान झाल्याचे कृषी अधिक्षक डॉ विद्या मानकर म्हणाल्या. मात्र पाउस व सध्याही असलेल्या आभाळी वातावरणात गावोगावी पेटलेली होळी विझू विझू झाली. पहाटेस होळीतील निखारे विझल्याने प्रथा भंगली.याच निखाऱ्यावर पाण्याचे हंडे ठेवले जातात. रंगाने माखून घरी आल्यावर गृहिणी या हंड्यातील गरम पाण्याने पती,मुलांना न्हाऊ घालतात. पण अवकाळी पावसाने निखारे विझले व पाणी गरम झालेच नाही. असा तक्रारवजा सूर महिलांचा उमटला. वर्धेसह असंख्य गावात चारवेळा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी झाडे कोसळली. सध्या आढावा घेणे सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले म्हणाले.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष