लोकसत्ता टीम

बुलढाणा: जिल्ह्यात रात्रभर कमी अधिक प्रमाणात बरसणाऱ्या अवकाळी पावसाने आज सकाळी रताळी( ता सिंदखेडराजा) गावात रौद्र रूप धारण केले. येथे वीज कोसळून १६ बकऱ्या ठार झाल्या. यावेळी प्रसंगावधान दाखविल्याने दोघा व्यक्तींचे प्राण बचावले.

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा

प्राथमिक माहितीनुसार रताळी येथे आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, वीज कोसळून भिकाजी जाधव यांच्या १६ बकऱ्या दगावल्या. यावेळी शेतमालक भिकाजी सखाराम जाधव व शशिकला आव्हाळे यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली आसरा घेतल्याने ते बचावले.

आणखी वाचा- चंद्रपूर: सर्वत्र रात्रभर वादळी वाऱ्यासह पाऊस; वीज आणि पाणी पुरवठा खंडित, झाडे कोसळली

घटनास्थळी महसूल विभागाचे कर्मचारी व पोलीस दाखल झाले आहे. सरपंच उषा पाटील यांनी ही माहिती दिली. पंचनामा करण्यात येत असून अहवाल सिंदखेडराजा तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार असल्याचे तलाठी शेळके यांनी सांगितले.