बुलढाणा : समृद्धी महामार्ग आणि जीवघेणे अपघात हे समीकरण आता नवीन नाही. मात्र, आज शुक्रवारी दुपारी झालेला विचित्र मत्स्य अपघात चर्चेला कारणीभूत ठरला आहे.

‘समृद्धी’वर माशांचा खच! मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड

हेही वाचा – चंद्रपूर : सायली, आकाशसोबत विद्यार्थ्यांनी धरला ठेका

uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
heavy traffic on manor wada bhiwandi state highway closed due to crack in bridge near manor
पालघर: मनोर वाडा अवजड वाहतूक बंद; टेन जवळील पुलाच्या सुरक्षिततेबद्दल शंका
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

हेही वाचा – “देशात हुकूमशाहीची अधिकृत सुरुवात”, खासदार धानोरकर यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “पराभवाची भीती..”

प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर मेहकरपासून २५ किलोमीटर अंतरावर डोणगावनजीक हा अपघात झाला. पश्चिम बंगालची (डब्ल्यू. बी. २५ के ८२८६ क्रमांकाची) मालमोटार मासे घेऊन जात असताना या वाहनाला अपघात झाला. यामुळे हे वाहन पलटले. त्यामुळे त्यातील मासे मार्गावर विखुरले. सर्वत्र माशांचा खच पडला. या अपघाताची माहिती पसरताच मासे गोळा करण्यासाठी युवक व ग्रामस्थांची झुंबड उडाली. अपघातस्थळी ‘पळा पळा पुढे कोण पळे’ असे चित्र निर्माण झाले. यामुळे जीव वाचल्याचा आनंद मानावा की, माशांच्या राजरोस अपहरणाचे दुःख मानावे, असा प्रश्न बंगाली चालकासमोर पडला.