नागपूर : देशात दरवर्षी ११ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वन शहीद दिन पाळला जातो. भारतातील वन्यजीव, जंगले आणि जंगलांचे रक्षण करण्यासाठी प्राण गमावलेल्या कामगारांचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या दिवशी देशभरातील वनक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये वन कर्मचाऱ्यांच्या योगदानाला महत्त्व दिले जाते.

११ सप्टेंबर १७३० साली भारतात ‘खेजर्ली हत्याकांड’ ही एक ऐतिहासिक घटना घडली. या दिवशी जोधपूर किल्ला बांधताना चुनखडी आणि लाकडाची गरज होती, म्हणून दिवाण गिरधरदास भंडारी यांनी त्यांच्या सैनिकांना जंगलातून लाकूड आणण्याचा आदेश दिला. सैनिक झाडे तोडण्यासाठी पुढे सरसावले, पण अमृता देवी बिश्नोई नावाच्या महिलेच्या नेतृत्वाखाली काही गावकरी त्यांच्या झाडांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यासमोर उभे राहिले. खेजरीची झाडे आपल्यासाठी पवित्र आहेत आणि ती तोडू देणार नाहीत असे अमृताने सांगितले. यानंतर सैनिक संतप्त झाले आणि त्यांनी गावातील लोकांना ठार केले. यात अमृताच्या मुलासह ३५० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला.

tabebuia rosea flowers Mumbai
निसर्गलिपी : बहराचा उत्सव
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
bmc s Divisional Office formed Forest Rights Committee
गोराईमधील आदिवासी पाड्यांतील रहिवाशांची वनहक्क समिती, येऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी समिती
Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
jijau Jayant 2025
जिजाऊंच्या जयघोषाने मातृतीर्थ दुमदुमले, सिंदखेडराजात पाऊण लाख शिवभक्त
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…

हेही वाचा – नागपुरात प्रथमच ‘एसटी’ची महिला कर्मचारी उपोषणावर, विभाग नियंत्रकांवर आरोप काय?

हेही वाचा – सासरा हॉलमध्ये टीव्ही बघतो, नवरा कुत्रा बांधून ठेवत नाही म्हणून घटस्फोटासाठी आलेल्या २३ कुटूंबांचे मनोमिलन

जेव्हा राजाला ही घटना कळली तेव्हा त्याने ताबडतोब आपल्या सैनिकांना परत बोलावले आणि त्यांच्यासह विष्णोई समाजाच्या लोकांची माफी मागितली. यानंतर राजा महाराजा अभय सिंह यांनी बिश्नोई समाजाच्या गावांच्या आसपासच्या भागात झाडे तोडली जाणार नाहीत आणि प्राण्यांची हत्या केली जाणार नाही, अशी घोषणा केली.

Story img Loader