जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्या १९ हजारांचा टप्पा ओलांडत असताना मृत्युदरही वाढत आहे. शहर परिसरात तीन दिवसांत २२ रुग्णांचा मृत्यू झाला, तर जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ३३५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार सद्य:स्थितीत चार हजार ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. सध्या नाशिक (१६५), चांदवड (४०), सिन्नर (२२६), दिंडोरी (६९), निफाड (१८४), देवळा (१०४),  नांदगांव (९२), येवला (सहा), त्र्यंबकेश्वर (१५), सुरगाणा (१६), कळवण (तीन), बागलाण (३८), इगतपुरी (४३), मालेगांव ग्रामीण (५७) याप्रमाणे नाशिक ग्रामीणमध्ये एकूण एक हजार ५८ रुग्णांवर उपचार होत आहेत.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात तीन हजार ३०७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १९६, तर जिल्ह्याबाहेरील चार याप्रमाणे एकूण चार हजार ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात  १८ हजार ५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीण १३९, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३३३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८६ आणि जिल्ह्याबाहेरील २० अशा एकूण ५७८  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहर परिसरात महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांवर उपचारासाठी १२४ व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारीही वाढत आहे. नाशिक ग्रामीणमध्ये ७२.२८, नाशिक शहरात ७१.१६, मालेगाव ८०.६१, तर जिल्हा बा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.७१  टक्के असे आहे.