राष्ट्र सेवा दलाच्या अमृत महोत्सवानिमित्त १४ मार्च रोजी दुपारी तीन वाजता गोवर्धन येथील निर्मल ग्राम सेवा केंद्रात माजी गृहराज्यमंत्री व ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत दलाचा मेळावा होणार आहे. मेळाव्यात भारतीय संविधान आणि व्यक्तिस्वातंत्र्य या विषयावर परिसंवाद होणार आहे. याशिवाय वसुंधरा केसकर व प्राचार्य सर्फराज पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्यामची आई गौरव पुरस्कार व सानेगुरुजी सेवा गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच विशेष अतिथी सन्मान, राष्ट्र सेवा दल अमृत महोत्सव निधी अर्पण सोहळा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यास सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे