पिंपळगाव बसवंतमधून चळवळीसाठी मदतीचा ओघ; सहा लाखांचा निधी जमा
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शाश्वतपणे उभे करण्यासाठी ‘मित्र’ संस्थेने सुरू केलेला प्रयोग निश्चितच यशस्वी होईल. संस्थेची ही चळवळ शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आहे, अशी माहिती मित्र संस्थेचे विश्वस्त वनाधिपती विनायक पाटील यांनी दिली. मित्र संस्थेने सुरू केलेल्या चळवळीसाठी समाजातून मदतीचा ओघ सुरू झाला असून एकटय़ा पिंपळगाव बसवंतमधून सुमारे सहा लाख रुपयांचा निधी मित्र संस्थेकडे जमा झाला आहे.
मित्र (महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ऑफ रुरल एरियाज) आणि बायफ (भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान ) या संस्था स्वातंत्र्यसेनानी डॉ. मणिभाई देसाई यांच्या प्रेरणेने १९६७ पासून शेतकऱ्यांच्या उत्कर्षांसाठी कार्य करत आहेत. मित्र संस्थेने नाशिक जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना उभारी देण्यासाठी ‘नवजीवन’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यात मित्रचे स्वयंसेवक त्या कुटुंबीयांची भेट घेऊन शेतीतील अडचणी जाणून घेत त्यावर उपाय सुचवितात. त्या कुटुंबीयांना एक एकर फळबाग उभारून देण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे खर्च एक लाख रुपये आहे. शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या मित्र संस्थेचे कृषी अधिकारी नवजीवन प्रकल्पातंर्गत लाभार्थी कुटुंबाशी सतत संपर्क ठेवून त्यांना माती परीक्षण, उत्पादन खर्च कमी करणे, पिकांच्या वाणाची निवड, नवीन पिकांची लागवड, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. नाशिक जिल्ह्य़ात आत्महत्याग्रस्त कुटुंबांची संख्या ८३ आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी मित्रने हे आश्वासक उत्तर शोधले आहे. यासाठीचा निधी विविध संस्था व व्यक्तींच्या देणगीतून उभारला जात आहे. मित्र संस्थेचे विश्वस्त विनायकदादा पाटील यांनी पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापारी असोसिएशनचे सोहनलाल भंडारी यांच्याकडे मदतीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर शेतकऱ्यांच्या बळावरच आमचा व्यवसाय असल्याने त्यांना अडचणीत मदत करणे ही बांधिलकी असल्याचे स्पष्ट करत व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार निफाड तालुक्यातील तीन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना द्राक्षबाग, जलकुंभ यासह मागणीप्रमाणे पायाभूत सुविधा कांदा व्यापाऱ्यांच्या सहकार्याने मिळणार आहेत.
मित्र संस्थेला कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शाह यांनी तीन लाख रुपयांचा धनादेश विनायकदादा पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. ज्या शेतकरयांच्या कष्टामुळे व्यापार वाढला ते अडचणीत असतांना मदत करणे आमची नतिक जबाबदारी असल्याचे शहा यांनी सांगितले. िपपळगावमधील विविध संस्था व दानशुर व्यक्तींनी सुमारे तीन लाख रुपयांची मदत जीवनाशी झुंज देणाऱ्या कुटुंबियांसाठी दिली. यामध्ये दिलीप बनकर यांनी स्व अशोकराव बनकर पतसंस्थेच्या माध्यमातून एक लाख, िपपळगाव र्मचट बँक एक लाख, महेंद्र गांगुर्डे यांनी बेदाणा उत्पादन संघटनेच्या वतीने ५१ हजार, भास्करराव बनकर यांनी २५ हजार, बाळासाहेब भुतडा यांनी २१ हजाराची देणगी दिली. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसाठी िपपळगाव शहरातून सुमारे सहा लाख रुपयांचा निधी मित्र संस्थेकडे संकलित झाला. मित्र संस्थेचे समन्वयक सुधीर वागळे यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. निफाड तालुक्यातील दोन, चांदवड तालुक्यातील चार आणि बागलाण, देवळा तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे आठ आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी या योजनेत सहभागी होण्यास संमती दिली आहे. इतरही कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या संमंतीनुसार त्यांचा सहभाग व पीक पद्धती ठरविण्यात येणार आहे.
निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथील आपत्तीग्रस्त कुटुंब प्रमुख ताराबाई बबन पडोळ यांची अडीच एकर द्राक्षबाग असून निधीअभावी त्या बागेतील मांडवाची उभारणी अर्धवट राहिली.
परिणामी कमी उत्पन्न येऊन कुटुंब आíथक अडचणीत आले. या महिलेच्या विनंतीवरून लोखंडी पट्टय़ा, तारा यांची पूर्तता करून मांडव पूर्ण करण्यात आला. त्यास ६७ हजार रूपयांचा खर्च आला. संस्थेने केलेल्या मदतीच्या आवाहनामुळे ‘ओनियन र्मचट असोसिएशन पिंपळगाव’ या संस्थेने तीन लाख रुपये देणगी देत तीन कुटुंबे दत्तक घेतली. या योजनेसाठी ‘मित्र नाशिक’ या नावाने धनादेश देण्याचे आवाहन संस्थेचे विश्वस्त विनायक पाटील, मुख्य कार्यक्रम समन्वयक व्ही. बी. दायमा यांनी केले आहे. िपपळगाव कांदा व्यापारी असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास मित्रचे व्ही. बी. दायमा, राहुल जाधव, अश्लेषा देव, कांदा व्यापारी असोसिएशनचे सोहनलाल भंडारी, पिंपळगावचे सरपंच महेंद्र गांगुर्डे आदी उपस्थित होते.