जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोन जण गंभीर झाले आहेत. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील रांजणगाव फाट्याजवळ ट्रक आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. यात अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी सहा जण एकाच कुटुंबातील होते. मृत पावलेले सर्वजण हे बोढरे गावातील रहिवासी होते. या घटनेमुळे बोढरे गावावर शोककळा पसरली आहे. राजेंद्र चव्हाण, नामदेव चव्हाण, सीताबाई चव्हाण, नितेश चव्हाण, पंडीत राठोड, मिथुन चव्हाण, शुभम चव्हाण अशी मृतांची नावे आहेत.