नाशिक: विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेला राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप कामगार न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला असला तरी संपकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दुसरीकडे, संप बेकायदेशीर ठरविल्याने महामंडळ प्रशासनाच्या आशा पल्लवित झाल्या असून जिल्ह्यात खासगी वाहनचालकांच्या मदतीने १४२ बसगाडय़ा रस्त्यावर उतरल्या आहेत. तसेच सध्या १२०० कर्मचारी कामावर रुजू झाले असल्याचा दावा विभाग नियंत्रकांकडून करण्यात आला आहे. असे असले तरी नाशिक (दोन) तसेच मनमाड या आगारातून अद्याप एकही बस बाहेर पडलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपास अडीच महिन्याहून अधिकचा कालावधी झाल्यानंतरही संप सुरूच आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत अनेक वेळा संपकऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन करूनही संपकऱ्यांवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. संप अधिक दिवस सुरु राहिल्याने संपकऱ्यांच्या घरातील अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. राज्य सरकार आपली मागणी मान्य करणार, या आशेत असलेल्या संपकऱ्यांना मुंबई येथील कामगार न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरविल्याने धक्का बसला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1200 st employees rejoin duty in nashik district zws
First published on: 19-01-2022 at 02:09 IST