लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा आणि धर्मांतर विरोधी कायदाही लागू करावा, दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी हिंदू संघटनांच्यावतीने सोमवारी शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.दिल्लीच नव्हे तर, राज्यात लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करीत असल्यामुळे देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर, वरद लक्ष्मी लॉन्स येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने व्यापक बैठक झाली. त्यात बी. डी. भालेकर मैदानावरून मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.
धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा, श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर, संघटनेवर, राजकीय पक्षांवर कारवाई करावी, अशा आशयाच्या मागण्या करण्यात आल्या.

Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
Gujarat Freedom of Religion Act
हिंदू अन् बौद्ध धर्म वेगळा, आता धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार; गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा काय सांगतो?
Manifesto of Samajwadi Party released
हमीभावासाठी कायदा करण्याचे आश्वासन; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित
raju shetty uddhav thackeray (1)
“…म्हणून मी ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नाही”, राजू शेट्टींनी स्पष्ट केली भूमिका