नाशिक : समाजाप्रती असलेली बांधिलकी स्वामी समर्थ सेवामार्गाने सांभाळली आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या हाती अधिक पैसा येईल. यादृष्टीने सरकारसह समर्थ मार्गासारख्या अनेक माध्यमातून मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी अधिक सुखी होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील डोंगरे वसतिगृह मैदानात आयोजित कृषी महोत्सवाचा रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब मोरे यांनी पारंपरिक आणि आधुनिक शेतीची सांगड घालून शेतकऱ्यांच्या उत्कर्षांसाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे सांगितले. सहा महिन्यांपासून सत्तेवर आलेले आमचे सरकारही सर्वसामान्य जनता आणि शेतकरी केंद्रिबदू ठरवूनच काम करीत आहे. हे सरकार केवळ सत्तेवर बसलेल्या एका राजकीय पक्षाचे नाही तर राज्यातील प्रत्येक जनतेचे आहे. शेतकरी आणि जनतेला पायाभूत सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी सरकारचा नेहमीच प्रयत्न राहील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांनी समर्थ सेवामार्गातर्फे शेतकरी, समाज, राष्ट्रासाठी करण्यात येत असलेल्या कामाचे कौतुक केले. सेंद्रिय शेतीचा नुसता मंत्र देऊन गुरुमाऊली थांबले नाहीत तर अडीच लाख शेतकरी या माध्यमातून जोडून त्यांना अधिक उत्पन्नाचा मंत्र दिला. साडेचारशे महिला बचतगट स्थापन करून हजारो भगिनींना तर हजारो युवकांना रोजगार दिला. एक लाख विवाह नोंदणी करून शेकडो युवकांचे विवाह सामुदायिक सोहळय़ात लावण्यात आले, असेही त्यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annasaheb more felicitated chief minister eknath shinde at the agricultural festival in nashik zws
First published on: 30-01-2023 at 05:13 IST