लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: पालक मुलांच्या नोकरीसाठी सरकारी नोकरीसाठी वशिला लावण्यासाठी पैसे देण्यास तयार आहेत. मात्र, याचाच फायदा घेत भामटे घेत आहेत. असाच धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडला. मुलाला मंत्रालयात मोठ्या पदासह रेल्वेत कनिष्ठ अभियंतापदावर नोकरी लावून देतो, असे सांगत विमा कंपनीतील ५८ वर्षी व्यक्तीची सुमारे २२ लाखांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिव कॉलनीतील रहिवासी प्रवीणचंद्र दिघोळे (वय ५८, रा. शिव कॉलनी, जळगाव)
आणखी वाचा- सहायक फौजदारासह तीन पोलिसांना लाच स्वीकारताना अटक
मात्र, दिघोळे मुंबईत गेले. मात्र, त्यांना कुणीही भेटले नाही. शेवटी त्यांना पुन्हा माघारी परतावे लागले. त्यानंतर दिघोळेंना ओसवाल याने तुम्हाला दुसरी नोकरी देतो, असे सांगत त्यानेच ओळख करून दिलेल्या हरताली प्रसाद रोहिदास याने दिघोळेंना मुलाला रेल्वेत कनिष्ठ अभियंतापदाचे नियुक्तीपत्र देतो, असे आमिष दाखवून सहा लाख रुपये मागितले. दिघोळेंनी हरतालीच्या बँक खात्यावर ८ ते ११ नोव्हेंबर २०२१ दरम्यान सहा लाख रुपये पाठविताच दिघोळेंच्या व्हॉट्सअॅपवर नियुक्तीपत्र पाठविले. मात्र, त्यांना कुठलीही नोकरी लावून दिली नाही. आपली फसवणूक झाल्याने दिघोळे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या तक्रारीनुसार चंद्रभान ओसवाल, अनिल ओसवाल, हरताली प्रसाद रोहिदास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.