जळगाव : जिल्ह्यातील पारोळा शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे फाट्यावर दोन भरधाव मोटारींची समोरासमोर धडक झाल्याने सुरत येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. धडक देणाऱ्या मोटारीतील नाशिकचे चार जण जखमी झाले आहेत. सुरत शहरात किराणा व्यवसाय करणारे सुधीर पाटील (४७) हे पत्नी ज्योती (४२) यांच्यासह पारोळा तालुक्यातील लोणी येथे पुतणीच्या लग्न कार्यासाठी मोटारीने येत होते. पारोळा शहर ओलांडून म्हसवे फाट्यावरून लोणीला जाणाऱ्या रस्त्याकडे वळत असतानाच त्यांच्या मोटारीला सोमवारी सायंकाळी जळगावहून पारोळ्याकडे येणाऱ्या भरधाव मोटारीने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, पाटील दाम्पत्याच्या मोटारीचा चुराडा झाला. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. समोरून धडक देणाऱ्या मोटारीतील शिरीष लढ्ढा (४०), उमेश लहाने (४२), चालक प्रवीण तागड आणि मिरज चांदे (सर्व रा.नाशिक) हे जखमी झाले.

हेही वाचा : निवडणुकीनंतर रस्त्यांवरील खड्डे पुन्हा ऐरणीवर, मनसेने इशारा देताच मनपाची तक्रार निवारण यंत्रणा

kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
deccan police registered case against four including woman for allegedly assaulting anti encroachment squad
फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा
person has died in an accident on Shiv Panvel road
नवी मुंबई: विचित्र अपघात एक ठार
Tragic Accident on mumbai Ahmedabad Express Highway
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जखमी
Two people on two-wheeler died in collision with speeding car
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, लोहगाव परिसरातील घटना
Maharashtra accident 11 deaths
तीन दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू, सोलापूर, जालन्यात मोटारींचे अपघात; चंद्रपुरात दुचाकीची ट्रकला धडक

परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. जखमींना पारोळा शहरातील कुटीर रुग्णालयात दाखल केले. पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी समांतर रस्त्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. जोपर्यंत समांतर रस्त्याचे काम करण्यासंदर्भात ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली.

Story img Loader