नाशिक: आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य रोजंदारी तृतीयश्रेणी आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा नाशिकहून विविध मागण्यांसाठी मुंबईकडे निघाला असून शुक्रवारी सकाळी मोर्चेकऱ्यांनी कसारा घाटात अचानक रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मानधनवाढ, सेवा सुरक्षा, सरसकट समायोजन यासह इतर मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा मुंबईकडे निघाला आहे. १२ जून रोजी सकारात्मक चर्चा झाल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला होता. परंतु, १० दिवस उलटूनही सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने भरपावसात मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात शेकडोंच्या संख्येने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले कर्मचारी सहभागी झाले असून मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Efforts underway to reduce human-wildlife conflict says Vivek Khandekar
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
Khadakpada residents in Kalyan West express displeasure over delayed waste collection
कल्याणमध्ये खडकपाडा भागात कचऱ्यांच्या ढीग, वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने नागरिक नाराज
Kalyan-Dombivli water, amrit water channel,
कल्याण-डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट, अमृत जलवाहिनीचे काम सुरू असताना विद्युत वाहिका तुटली
Drought of Funds , Micro Irrigation Scheme,
सूक्ष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ, राज्यातील पावणेदोन लाखहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित
Work on direct water pipeline from Gangapur Dam begins
गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीचे काम प्रारंभ, नाशिकचा तीन दशकांचा प्रश्न मार्गी लागणार

हेही वाचा : नाशिक: दुष्काळात पाण्याचा अपव्यय; काश्यपीतील विसर्ग निम्म्यावर, वहनव्यय वाढणार

नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरपावसात निघालेल्या बिऱ्हाड मोर्चाने गुरुवारी कसारा घाटाजवळील घाटनदेवी येथे मुक्काम ठोकला होता. शुक्रवारी कसारा घाटातील मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या अशा दोन्ही मार्गांवर ठिय्या देत बिऱ्हाड मोर्चाने आंदोलन सुरू केले. आंदोलनामुळे दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडी होऊन दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर मोर्चेकऱ्यांनी पुढे जाणे सुरु केले.

Story img Loader