जळगाव जिल्ह्यातून दोन धाम यात्रेला भाविकांना घेवून गेलेल्या खासगी बसला ओडिसाच्या सीमेवरील सोहला गावाजवळ रविवारी पहाटे एक वाजता अपघात झाला. अपघातातील जळगाव जिल्ह्यातील सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत.

जळगाव येथून गुजरातमध्ये नोंदणी असलेल्या गंगोत्री ट्रॅव्हल्सच्या खासगी बसमधून आसाम, नेपाळ, गंगासागर जगन्नाथ पुरी, उज्जैन, वाराणसी, कामाख्या देवी या तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी ४९ भाविक गेले आहेत. या भाविकांमध्ये जळगाव जिल्ह्यातील ३१ प्रवासी आहेत. जिल्ह्यातील सर्व यात्रेकरू सुखरूप असून मंगलाबाई पाटील (बळीराम पेठ, जळगाव) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना

हेही वाचा – नाशिक : धर्मांतराच्या प्रलोभनाने महिलेवर अत्याचार, चार संशयितांना पोलीस कोठडी

हेही वाचा – “बाळासाहेब थोरातांनीच खरं काय सांगावे,” काँग्रेसमधील वादावर छगन भुजबळ यांचा सल्ला

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबलपूर जिल्हाधिकारी आणि बारलगढ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सर्व अपघातग्रस्तांना मदतीविषयी सूचित केले. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने सर्व अपघातग्रस्तांना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल केले. यात्रेच्या आयोजक शोभा पाटील (रा. जळगाव) या जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार संबलपूर येथे रवाना झाल्या असून, सर्व यात्रेकरूंना संबलपूर प्रशासनाच्या मदतीने जळगाव येथे सुखरूप आणण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा नियंत्रण कक्ष ०२५७-२२१७१९३ /२२२३१८० अथवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (९३७३७८९०६४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.