लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : मनमाड ते इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया आता नाशिक जिल्ह्यातही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने उपजिल्हाधिकारी (भूसंपादन, वैतरणा जलविद्युत प्रकल्प) रवींद्र भारदे यांची नियुक्ती केली आहे. एकूण ३०९ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गात साधारणत: १४० किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रात आहे. धुळे जिल्ह्यात आधीच भूसंपादन सुरू झाले आहे. आता नाशिकच्या नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात रेल्वे मार्गासाठी १२० हेक्टरहून अधिक जागा संपादित केली जाण्याची शक्यता आहे.

Rajewadi Station , Purandar Airport ,
पुणे : राजेवाडी स्थानकापासून पुरंदर विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका, एकात्मिक वाहतूक आराखड्यात प्रकल्प प्रस्तावित
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Honaji Tarun Mandal celebrating its centenary silver jubilee unveiled new statue of Ganesh Destroyer this year
होनाजी तरुण मंडळाची नवी ‘संहारक गणेश मूर्ती’ गणेश जयंतीला प्रतिष्ठापना
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
Mahakumbh , Prayagraj , Railway, Plane,
प्रयागसाठी ‘प्रयाण’ सुरूच! हवाई, रेल्वे, खासगी वाहनांचे आरक्षण फुल्ल
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
abscond criminal detained under mpda act
‘एमपीडीए’ कारवाईनंतर फरारी झालेल्या गुंडाला अटक; कारवाई टाळण्यासाठी डोंगरात वास्तव्य
Mahatma Gandhi death anniversary, smart prepaid meter, Protest , Nagpur,
नागपूर : स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात आंदोलन गांधी पुण्यतिथीच्या दिवशी

अनेक वर्षांपासून रखडलेल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला भूसंपादनामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीने १८ हजार ३६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पास मंजुरी दिली होती. या माध्यमातून महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यातील अविकसित भाग देशातील अन्य भागांशी रेल्वे मार्गाने जोडले जाण्यास मदत होईल. मनमाड-मालेगाव-धुळे-नरडाणा-शिरपूर-महू-इंदूर असा हा रेल्वेमार्ग आहे. यातील महाराष्ट्रात साधारणत: १४० किलोमीटर अंतराचा मार्ग असेल. यामध्ये धुळे आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यात नरडाणा, शिरपूर भागात भूसंपादन सुरु झाले आहे.

आणखी वाचा-इगतपुरी तालुक्यातील अपघातात कल्याणचे तीन जण ठार, दोन जखमी

नाशिक जिल्ह्यात या प्रक्रियेबाबत रेल्वे प्रशासनाने विचारणा केली होती. जिल्हा प्रशासनाने भूसंपादन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन, वैतरणा जलविद्युत प्रकल्प) रवींद्र भारदे यांचे नाव निश्चित केले. याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालयास दिली गेली आहे. नाशिकचा विचार करता नांदगाव, मालेगाव या दोन तालुक्यांत रेल्वे मार्गासाठी भूसंपादन होणार आहे. सुमारे १२० हेक्टरहून अधिक जागा संपादित करण्याची शक्यता वर्तविली जाते.

रेल्वे मार्गाचे महत्व

मनमाड-इंदूर हा रेल्वेमार्ग केवळ रेल्वेच्याच फायद्याचा नव्हे तर, सर्वांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. या मार्गावर यंत्रमागचा मोठा व्यवसाय असून व्यावसायिकांना माल वाहतुकीचे स्वस्त साधन उपलब्ध होऊ शकते. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग हा वाहतुकीसाठी उत्तम साधन ठरणार आहे. कृषि मालाची रेल्वेने अतिशय स्वस्तात वाहतूक होऊ शकते.

Story img Loader