नाशिक – पाणी पुरवठ्यातील समस्यांमुळे नागरिकांच्या रोषाला तोंड देणाऱ्या महापालिकेने काही विशिष्ट ठिकाणी विंधन विहिरींतील पाणी उपलब्ध करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मनपा इमारती, उद्यान, शौचालये, दवाखाने व शाळा आदी ठिकाणी टंचाईच्या काळात आणि नळ जोडणी नसलेल्या भागासह झोपडपट्टीत विंधनविहिरी करून हातपंप अथवा विद्युत पंप बसविण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>> विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ‘गुरूशाला’ : आदिवासी विकास विभागाचा उपक्रम

smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bank mitra warn of agitation over low remuneration lack of protection of service
‘बँक मित्रां’चा आंदोलनाचा इशारा; तुटपुंजे मानधन, सेवाशर्तींचे संरक्षण नसल्याने त्रस्त
Employee Stress , App , Pune Municipal corporation ,
कर्मचाऱ्यांच्या ताणावर ॲपची मात्रा ! पुणे महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव
Ghodbunder residents questions to thane municipal officials regarding water tanker and water issues
आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
Forest Minister Ganesh Naik Navi Mumbai MIDC
नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक, वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
Uran gas power plant is producing 300 MW of electricity instead of 672 MW
वायू पुरवठ्याविना वीज प्रकल्प ‘गॅसवर’ उरण वीज प्रकल्पातील उत्पादन निम्म्यावर

सर्वसाधारण सभेत ५० लाख रुपयांच्या या कामास मान्यता देण्यात आली. मनपाचे वेगवेगळे विभाग विविध कारणास्तव विंधन विहिरीची मागणी करतात. मनपा शाळा, उद्याने, शौचालये, दवाखाने या ठिकाणी तशीच मागणी असते. त्यासाठी मनपा क्षेत्रात विंधनविहिरी करून हातपंप व विद्युत पंप बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. काही महिन्यांपासून शहरातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या कारणास्तव अनेकदा आंदोलने झाली होती. अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठ्याच्या समस्या उद्भवत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाईचा इशारा दिला गेला होता.

हेही वाचा >>> परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा

मध्यंतरी एकाच दिवशी अनेक वाहिन्यांमधील गळती दुरुस्ती आणि वितरण प्रणालीतील कामे करण्यात आली होती. सध्या तक्रारी कमी झाल्या असताना महापालिकेने विंधनविहिरींच्या माध्यमातून काही भागात पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन केल्याचे दिसत आहे. याआधी अनेक भागात विंधनविहिरी करून हातपंप बसविले गेले. बगीचा व मोकळ्या भूखंडात हातपंप दृष्टीपथास पडतात. परंतु, त्यातील बहुतांश हातपंप आज वापरात नाहीत. विंधन विहिरी पाणी टंचाईच्या काळात उपयोगी ठरतील, असा विचार पाणी पुरवठा विभागाने केला आहे. मनपा इमारती, उद्याने, शौचालये, दवाखाने, शाळा, जॉगिंग ट्रॅक आदी ठिकाणी विंधनविहिरींचे पाणी वापरण्याचा मनपाचा विचार आहे. या कामासाठी मंजूर झालेल्या निधीतून सुमारे ४० ते ४५ ठिकाणी विंधनविहिरी करता येतील, असे सांगितले जाते.

Story img Loader