धुळे – जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील खोरी, टिटाणे आणि हट्टी भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीमुळे २५० ते ३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. केळी,पपई या फळपिकांसह कांदा, गहू आणि हरभरा ही पिके हातची गेली.

हेही वाचा – नाशिक : अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका; द्राक्षांची खुडणी थांबली, तडे जाण्याची भीती

Explosion tire shop near Sangola
सोलापूर : सांगोल्याजवळ टायर दुकानात स्फोट; एकाचा मृत्यू, दुसरा जखमी
kolhapur fight between two groups , kolhapur violence marathi news,
कोल्हापूर : कागल तालुक्यातील व्हनाळी यात्रेत दोन गटांत मारहाण; अ‍ॅट्रोसिटीसह परस्परविरोधी गुन्हे दाखल
aap kandil morcha in kolhapur
कोल्हापुरातील २ हजार दिवे बंद; आपचा महापालिकेवर कंदील मोर्चा
Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल

हेही वाचा – धुळे जिल्ह्यात प्रचंड गारपीट

साक्री तालुक्यातील खोरी, टिटाणे भागात सोमवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे केळी आणि पपई फळबागा उद्ध्वस्त झाल्या. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने फळ उत्पादकांनी शासनाकडे नुकसान भरपाईसाठी मागणी केली आहे. महसूल यंत्रणेने गारपीटग्रस्त भागात तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी २५० ते ३०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. अधिकाधिक नुकसान खोरी व टिटाणे या गाव शिवारात झाले आहे. याशिवाय हट्टी, इंदवे आणि ऐचाळे या गावांमध्ये मध्यम स्वरुपाची गारपीट झाली आहे.