लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : मुंबईतील विजेची गरज भागवण्यासाठी ऐन पावसाळ्यात नाशिककरांना सोमवारी अकस्मात १० ते १२ तास भारनियमन सोसावे लागले. रात्रीपासून स्थानिक पातळीवरील भारनियमन अहमदनगरकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगितले गेले असतानाही मंगळवारी दुपारी नाशिकच्या अनेक वीज गायब झाली होती. हा भारनियमनाचा भाग नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला.

smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
electricity cost hike
वीजदरवाढ तूर्तास टळली, ‘डीसल्फरायझेशन’ची सक्ती दोन वर्षे लांबणीवर गेल्याने दिलासा
nashik road jail
नाशिकरोड कारागृहातील जमिनीत दोन भ्रमणध्वनी, गुन्हा दाखल
Thane Municipal Administration taking strict action for air pollution
हवा प्रदुषण रोखण्यासाठी पाहाणीबरोबरच दंडात्मक कारवाई, नोटीसीनंतर नियमांचे पालन होते की नाही, याची पाहाणी सुरू

मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीचा एक संच सोमवारी बंद पडल्याने संपूर्ण ग्रीड सतर्क होता. नाशिकला एकलहरे आणि बाभळेश्वर केंद्रातून वीज पुरवठा होतो. एकलहरे औष्णिक वीज केंद्रात तीनपैकी केवळ दोन संचावर सध्या वीज निर्मिती होत आहे. यातून ४२० मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित असते. मात्र, जुनाट संचांमुळे तितकी वीज निर्मिती होत नाही. अतिरिक्त वीज बाभळेश्वरहून नाशिकला पुरवली जाते. याच ठिकाणी मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या चार वाहिन्या आहेत. सोमवारी नाशिकची १४०० मेगावॉटची सर्वोच्च मागणी होती. मुंबईत विजेचा तुटवडा भासल्याने साधारणत: २०० मेगावॉट वीज तिकडे वळवली गेल्याने स्थानिक पातळीवर भारनियमन करणे भाग पडल्याचे महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. या दिवशी शहर व ग्रामीण भागात टप्प्याटप्प्याने भारनियमन करावे लागले. साधारणत: १२ तास नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. यादिवशी काही भागात वादळी पाऊस झाला. त्यामुळे अडचणीत भर पडली.

आणखी वाचा-नाशिक : रेल्वेत सापडलेल्या बालिकेची ओळख पटविण्याचे आव्हान

रात्री नाशिकला करावे लागणारे भारनियमन अहमदनगरकडे वर्ग करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, मंगळवारी परिस्थितीत सुधारणा झालेली नव्हती. सकाळी शहरात वीज पुरवठा सुरळीत होता. दुपारी एक वाजता गंगापूर रोडसह काही भागातील वीज पुन्हा गायब झाली. अनेकांनी त्याचा संबंध भारनियमनाशी जोडला. मात्र मंगळवारी शहरात कुठेही भारनियमन करावे लागले नसल्याचे महावितरणक़डून स्पष्ट करण्यात आले. तांत्रिक दोषामुळे एखाद्या भागातील वीज पुरवठा काही काळ खंडित होऊ शकतो, असे वीज कंपनीकडून सांगण्यात आले.

Story img Loader