नंदुरबार: गारपीट आणि अवकाळीने कंबर मोडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर न केल्याने संतप्त झालेले राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी राज्यकर्ते हे नालायक, हलकट आणि स्वार्थी असल्याची विखारी टीका केली. जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटण्यासाठी नंदुरबार येथे आलेल्या गोटे यांना पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन विचारल्यावर ते राज्यकर्त्यांवर चांगलेच घसरले. राज्यकर्ते हे केवळ बोलतात. मात्र त्यांना शेतकऱ्यांची अजिबात जाण नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यकर्त्यांचा फक्त माल लगाव आणि माल कमाव हा धंदा आहे. शेतकऱ्यांना एक दमडीची मदत न देणारे  हे हलकट राज्यकर्ते पुन्हा सत्तेत येतील असे वाटत नाही, असेही गोटे यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद आणि त्यांच्या विदेशातील भाषणामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणल्याने सूडामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरु असल्याचा आरोपही गोटे यांनी केला

eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
rohit pawar slams ram kadam ashish shelar
“सभागृहात अ‍ॅक्टिंग कशाला करताय? होय, आहे योगेश सावंत आमचा कार्यकर्ता”, रोहित पवारांचा राम कदमांवर हल्लाबोल!
PM Narendra Modi Yavatmal Rally
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो, देणगीसाठी स्कॅनर कोडही दिला
What Jitendra Awhad Said?
“…तर अजित पवार शरद पवारांच्या पायाशी येऊन बसतील”, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य