नाशिक – व्यापाऱ्यांच्या संपामुळे निर्माण झालेली कांदा कोंडी दूर होण्याच्या दिशेने पावले पडत असून लासलगाव बाजार समितीच्या विंचूरपाठोपाठ निफाड उपबाजारात सोमवारी लिलावाला सुरुवात झाली. दुपारी व्यापारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात बैठक होत असून एक ते दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत होतील, अशी शक्यता जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमधील एक हजारहून अधिक व्यापारी लिलावातून दूर झाल्यामुळे २० सप्टेंबरपासून कांदा लिलाव पूर्णत: बंद होते. या काळात शासन व प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका पार पडल्या. मात्र मागण्या मान्य होत नसल्याने व्यापारी माघार घेण्यास तयार नव्हते. परिणामी दैनंदिन एक लाख क्विंटलचे लिलाव थांबले होते. त्यामुळे २० ते २५ कोटींची उलाढाल थंडावली. प्रशासनाने तात्पुरते परवाने देऊन व अन्य जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना लिलावात उतरवून बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले होते. त्या अंतर्गत लासलगाव बाजार समितीने आधी विंचूर, त्यानंतर निफाड उपबाजारात लिलाव पूर्ववत केले. विंचूर उपबाजारात चार दिवसांत सुमारे ८० हजार क्विंटलचे लिलाव होऊन त्यास सरासरी २१०० रुपये मिळाले. निफाड उपबाजारात १८०० क्विंटलचे लिलाव झाले. सरासरी दोन हजार रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – नाशिक : बोधी वृक्षारोपण महोत्सवात दलाई लामांसह आंतरराष्ट्रीय नेत्यांचा सहभाग, सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश

हेही वाचा – नाशिक जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत आठ संवर्गांसाठी परीक्षा

सोमवारी प्रशासन आणि व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. गुरुवारपासून लासलगाव बाजार समितीत लिलाव पूर्ववत होतील. व्यापारी संघटनेशी प्राथमिक चर्चा झाली असून इतर बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत होतील, असा विश्वास मुलाणी यांनी व्यक्त केला. बहुतांश बाजार समितीत लिलाव बंद राहिल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. पाऊस व उन्हाच्या झळांनी चाळीत कांदा खराब होऊ लागला होता. लिलाव पूर्ववत झाल्यास घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Story img Loader