थंडीमुळे विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : जिल्ह्यात १४ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी शाळेची बेल वाजली. बदलते वातावरण, थंडीचा तडाखा, गारठा, पालकांच्या मनातील संभ्रम, करोना रुग्णांची वाढती संख्या यामुळे बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नाममात्र राहिली. महापालिका हद्दीतील काही शाळा सुरूच झाल्या नाहीत.  करोना रुग्णांचा आलेख उंचावत असला तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्य विभाग तसेच प्रशासनाकडून करण्यात येत आहे. १५ ते १८ वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. ग्रामीणसह शहर परिसरातून शाळा सुरू करण्याची सातत्याने मागणी झाल्याने शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये घंटा वाजली. विद्यार्थ्यांचे तापमापन, तो तंदुरूस्त असल्याचे प्रमाणपत्र तसेच अन्य काही सुरक्षा उपायांचा अवलंब करीत शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु, एरवीचा उत्सााह शाळांमध्ये दिसला नाही. दोन ते तीन दिवसांपासून वातावरणातत मोठय़ा प्रमाणावर गारठा वाढल्याने बालकांसह अनेकांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी सतावत आहे. यामुळे अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले नाही.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students first day school cold ysh
First published on: 25-01-2022 at 00:38 IST