नाशिक: गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी  केलेल्या कामाचे आज भाजपला मिळालेल्या यशात सर्वाधिक योगदान आहे. शेतकरी, शेतमजूर, दलित, ओबीसी अशा सर्व घटकांना पक्षात आणून त्यांनी भाजपला जनतेचा पक्ष बनविले, राज्यात पक्षाच्या विस्तारात त्यांची अतिशय महत्वाची भूमिका राहिली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 शनिवारी गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिन्नर तालुक्यातील नांदूरिशगोटे येथे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच अनुषंगिक विकास कामांसह उभारलेल्या गोपीनाथ गड या स्मारकाचे लोकार्पण झाले.  वंचित, मागासलेल्या घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी समर्पित भावनेने काम करणारे गोपीनाथ हे योध्दा होते. १९९२-९३ मध्ये संघर्ष यात्रा काढून त्यांनी महाराष्ट्र जागवला. त्यांच्या प्रयत्नातून १९९५ मध्ये शिवशाहीचे राज्य आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success is due to activists like gopinath munde asserts nitin gadkari ysh
First published on: 19-03-2023 at 00:02 IST