लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : पावसाळा संपून दोन महिनेही होत नाही तोच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष गावाला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामस्थांकडून १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवगाव येथील रस्त्यावर वाहतूक अडविण्यासह हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. टाकेहर्ष गावातील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ एल्गार कष्टकरी संघटनेने आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे.

Chandrashekhar Bawankule gave hints about confusion over allocation of guardian ministers will end in two days
पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून

२०२२-२३ पासून जल जीवन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. यासाठी काही कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली असली तरी ते काम अद्याप अपूर्णच आहे. या योजनेचे काम सुरू केल्यावर काही ठिकाणी जुनी जलवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे गावाला पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे.

आणखी वाचा-ईव्हीएमविरोधात धार्मिक संघटनाही मैदानात; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रशासनाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीवर मोर्चाही काढण्यात आला होता. तरीही प्रशासन आणि पाणी पुरवठा विभागाने कोणतीच हालचाल केली नाही. आता रास्ता रोको आणि हंडा मोर्चा काढून पंचायत समितीला निवेदन देण्यात येणार आहे.

Story img Loader