scorecardresearch

Premium

आमच्या मर्जीने बिहारची मुले शिक्षणासाठी महाराष्ट्रात; कथित तस्करी प्रकरणात पालकांचा दावा

या तपासात मदरसा आहे का, त्याची नोंदणी आहे का, यासह विविध मुद्यांंबाबत पथक सखोल चौकशी करणार आहे.

parents displeasure railway police case trafficking concerned
आमच्या मर्जीने बिहारची मुले शिक्षणासाठी महाराष्ट्रात; कथित तस्करी प्रकरणात पालकांचा दावा (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: बिहारमधून मुलांच्या तस्करीप्रकरणी या मुलांचे पालक मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांचे जाब -जबाब नोंदविले जात आहेत. या मुलांना आम्ही आमच्या मर्जीने शिक्षणासाठी महाराष्ट्रात पाठवले. आमची आर्थिक परिस्थिती नसल्याने हा निर्णय घेतला. मात्र रेल्वे पोलिसांनी संबंधितावर तस्करीचा गुन्हा दाखल केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

बहुसंख्य पालक हे सामान्य आर्थिक परिस्थितीतील व अशिक्षित असल्याचे आढळून आले. मात्र वास्तव पोलिसांच्या सर्वंकक्ष तपासणी नंतरच बाहेर येईल. दरम्यान लोहमार्ग पोलिस ठाण्यातून दोन पथके बिहार व सांगलीच्या दिशेने रवाना झाली. या तपासात मदरसा आहे का, त्याची नोंदणी आहे का, यासह विविध मुद्यांंबाबत पथक सखोल चौकशी करणार आहे. तपासासाठी वेळ कमी असल्याने शीघ्रगतीने तपास करण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे आहे. ५९ मुलांपैकी ३६ मुलांचे पालक कागदपत्रांसह येथील रेल्वे पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

हेही वाचा… शेतकरी संवादातून काँग्रेसतर्फे मोर्चेबांधणी; चांदवडला लवकरच शेतकरी संवाद मेळावा

जळगाव येथील बालसुधारगृहातील त्यापैकी २० मुलांचे पालक (आई, वडील) कागदपत्रे घेऊन गयारी (ता. अररिया, बिहार) येथून भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत. मनमाड पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा नूतन पदभार सांभाळणारे मारुती पंडित यांच्याशी संपर्क साधून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. उर्वरित ३० मुलांना नाशिकच्या बालसुधारगृहात दाखल केले आले. त्यापैकी १६ मुलांचे पालक छत्तीस तासांचा प्रवासानंतर भुसावळमध्ये दाखल झाले. त्यानंतर १६ पालकांनी मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन आपला जबाब नोंदविला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The parents have expressed their displeasure over the railway police registering a case of trafficking against the concerned dvr

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×