नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या अति दुर्गम भागातील मूलवड या ग्रामपंचायतीतंर्गत अनेक गावे, पाडे येतात. येथील महिलांना अनेक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आजही गावात येणाऱ्या टँकरमधील पाणी मिळविण्यासाठी एकच झुंबड उडते. बऱ्याचदा यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, हरसूल भागात टंचाई सातत्याने जाणवत राहते. टंचाई दूर करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधी तसेच शासन, प्रशासनाकडून कायमच दिले जाते. परंतु, गांभीर्याने कोणतेच प्रयत्न होत नसल्याने या भागात टंचाई कायम राहते. टंचाई परिस्थितीची पाहणी करण्यासाठी एखाद्या मंत्र्यांचा दौरा असला की, प्रशासनाकडून तातडीने हालचाली केल्या जातात. टंचाईग्रस्त भागास पाणी पुरवठय़ासाठी कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत, ते सांगितले जाते. दौरा आटोपला की पुन्हा या गावांकडे अधिकारी ढुंकूनही पाहत नाहीत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women in remote areas of trimbakeshwar struggling for water for many years zws
First published on: 26-05-2022 at 00:35 IST