पोलिसांची सामंजस्याची भूमिका; कामोठे-कळंबोली-खारघर भागात नाकाबंदी

नवी मुंबई : कोनोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने गुरुवारी रात्री आठपासून अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरात त्याचा परिणाम शुक्रवारी जाणवला. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता. तर शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांची गर्दी शीव-पनवेल मार्गावर कळंबोली येथे दिसून आली. पोलीस सर्व वाहनांची चौकशी करत होते. असे असले तरी शहरात शुकशुकाट होता तसेच पोलीस तुरळक दिसत होते.

शुक्रवारी कामोठे-कळंबोली-खारघर भागात नाकाबंदी करण्यात आल्याने परवानगी नसलेल्या वाहनचालकांना परत फिरावे लागत होते. त्यामुळे काही काळ गर्दी झाली होती.  नाकाबंदी करण्यात आली असली तरी शुक्रवारी अधिक कडक निर्बंधांचा पहिलाच दिवस असल्याने पोलीस सामंजस्याची भूमिका घेत होते. शहरातील सर्वच बाजारपेठा बंद दिसून येत होत्या. एपीएमसीवगळता कोठेही मोठ्या प्रमाणात पादचारी व वाहनांची वर्दळ दिसून आली नाही. मात्र पोलिसांची नजर चुकवून अनेकजण विनाकारण फिरतानाही दिसून येत होते.

सकाळी ८ ते ११ दरम्यान दुकानात गर्दी दिसून येत होती. हा कालावधी अतिशय अपुरा असून अपुरी असल्याने गर्दी होत आहे.

मुंबई : राज्य सरकारने सामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासावर निर्बंध घातल्यानंतरही शुक्रवारी अनेकांनी लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न के ला. यासाठी काहींनी अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या बनावट ओळखपत्राचा आधार घेत, तर काहींनी विनातिकीट प्रवासाचा प्रयत्न मध्य रेल्वेवर के ल्याचे उघडकीस आले.

ओळखपत्र व तिकीट पाहूनच प्रवाशांना स्थानकांमध्ये प्रवेश दिला जात होता. याशिवाय स्थानकातील फलाट, पादचारी पुलांवरही तिकीट तपासनीस तैनात करण्यात आले होते.

दादर स्थानक, कु र्ला व सीएसएमटीसह अन्य स्थानकातून एकू ण २५ प्रवाशांकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले. जप्त के लेल्या ओळखपत्रांमध्ये पालिका व विविध रुग्णालय व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नावाच्या ओळखपत्रांचा समावेश आहे. १५ प्रवाशांना  दादर स्थानकात पकडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

सवलतींमुळे निर्बंध राबविणे अशक्य

पनवेल : औद्योगिक वसाहती सुरू आणि अत्यावश्यक सेवेतील हॉटेल, किराणा यांमधून घरपोच वस्तू पुरवठा करणे या सर्व सवलतींमुळे शुक्रवारपासून सुरू झालेली संचारबंदी कठोरपणे राबविण्यात पोलिसांना अडथळा निर्माण झाला.

पनवेल तालुक्यातील विविध सरकारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी पालिका व इतर अत्यावश्यक सेवेकरी वगळता इतर सेवेतील कर्मचाऱ्यांना ये-जा करण्याची सवलत असल्याने नेमके कोणाला अडवावे, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये काम सुरू असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना ये-जा करता आली. इतर शहरांतूनही तीन पाळ्यांमध्ये कामगारांची ये-जा बससेवेमार्फत सुरू होती. तसेच शहरी भागांत सकाळच्या सत्रात अत्यावश्यक दुकाने सुरूअसल्याने दुकानातील मालक व कामगारवर्गावर पोलिसांना कार्यवाही करणे अशक्य होत आहे.

नागरिकांनी शहराबाहेर जायचे असल्यास परवानगी घेऊनच बाहेर जावे आणि शहरात प्रवेश करतानाही परवानगी असल्याशिवाय येऊ दिले जाणार नाही. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. – शिवराज पाटील उपायुक्त, (परिमंडळ दोन)

 

शुक्रवारी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून तो असाच कायम राहावा. रात्रीपासून नाकाबंदी करण्यात येत असून विनाकारण फिरणारे व मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य केले तर लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल. – सुरेश मेंगडे उपायुक्त (परिमंडळ एक)