ससून डॉक मच्छीमार बंदरावरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने उरणच्या करंजा येथे नवे बंदर उभारले जात आहे. दहा हजारांहून अधिक जणांना रोजगार देणाऱ्या या बंदरासाठी लागणारे १५० कोटी रुपयांना मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे चार वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. यावर प्रस्ताव तयार आहे. सहा महिन्यांत बंदराचे काम सुरू होईल अशी माहिती बंदर विभाग अधिकाऱ्यांनी दिली.
मासेमारीनंतर मासळी विक्रीची सोय असलेले मुंबईत ससून डॉक हे एकमेव बंदर आहे. या बंदरात मासळीची खरेदी विक्री, सफाई, साठवणूक, प्रक्रिया होत असते. गुजरातमधीलही मासळीचाही यात समावेश असतो. ससून बंदरात मासेमारी बोटींची संख्या वाढल्याने जागा कमी पडू लागली आहे. या बंदरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे १५ ते २० हजार रोजगार उपलब्ध आहेत. २०११ मध्ये करंजा येथे केंद्र आणि राज्य सरकारने ७५ आणि २५ टक्केच्या हिस्सेदारीतून ७० कोटी रुपये खर्चाचे नवे मच्छीमारी बंदर उभारण्यास सुरुवात केलेली होती. त्यामुळे कोकणातील मच्छीमारांना मासेविक्रीसाठी जवळचे बंदर मिळणार आहे. त्यामुळे याची प्रतीक्षा येथील मच्छीमारांना आहे.
करंजा बंदरातील ब्रेक वॉटरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काम करीत असताना २०१२ साली खडक लागल्याने बंदराच्या कामाच्या खर्चात वाढ होऊन तो ७० कोटीवरून दीडशे कोटींवर पोहोचला आहे. तर मच्छीमार बंदराच्या नियमात बदल होऊन केंद्र व राज्य सरकारच्या हिश्श्यात ५०-५० टक्केची सुधारणा करण्यात आली. या नवीन खर्चाच्या कामाची निविदा बंदर विभागाकडून काढल्याची माहिती बंदर विभागाचे कार्यकारी अभियंता राम काटकर यांनी दिली. बंदराच्या वाढीव खर्चाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. त्याला सहा महिन्यात मान्यता मिळेल, असे ते म्हणाले.

thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी
loksatta analysis adani group wins bid to redevelop bandra reclamation
विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही?
indus waters treaty
विश्लेषण : शहापूरकंडी धरणाद्वारे भारताने पाकिस्तानमध्ये जाणारा रावी नदीचा प्रवाह का रोखला? याचा जम्मू व काश्मीरला कसा फायदा होईल?