नवी मुंबईत सहा केंद्रांवर १२७८ परीक्षार्थी

लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी फेरपरीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. मुखपट्टी वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझर, ताप तपासणी करीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर सोडण्यात आले. नवी मुंबईत सहा केंद्रांवर १२७८ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.

दहावीची परीक्षा ५ डिसेंबर तर बारावीची परीक्षा १० डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे. नवी मुंबईत दहावीचे ४०५, तर बारावीचे ८७३ विद्यार्थी आहेत. मुंबई विभागातून दहावीचे १३,४८० तर बरावीचे २२,८४० विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.

दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे. करोना साथरोगाच्या पाश्र्वभूमीवर सर्व दक्षता घेतली जात असून पहिल्या दिवशी सर्वच केंद्रांत शांततेत परीक्षा पार पडली.
– संदीप सांगावे, विभागीय सचिव, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ