नवी मुंबई : मोरबे ते दिघा मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहाणार आहे.  बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांत बुधवारी (२३ जून) संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही.

तसेच या कालावधीत जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई महानगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठादेखील बंद राहील. गुरुवारी (२४ जून) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.