नागरिक, घरातून काम करणाऱ्यांची गैरसोय नवी मुंबई : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी जाीहर झाली आहे. या कालावधीत नागरिकांना घरात मनोरंजनाचे टिव्ही हे एकमेव साधन आहे. तसेच वर्क फॉर्म होम करणाऱ्यांना इंटरनेट सेवा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे हे काम करणाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करावे अशी मागणी होत आहे. देशात २१ दिवस टाळेबंदी जाीहर झाली आहे. आज टाळेबंदीचा तिसरा दिवस आहे. या काळात नागरिकांनी घरातून बाहेर पडायचे नाही, असे आदेश आहेत. त्यामुळे नागरिकांना घरातच मनोरंजन हवे असेल तर टिव्ही हे एकमेव साधन आहे. तसेच वर्क फार्म होम असणाऱ्यांना घरात इंटरनेट सेवा मिळणे गरजेचे आहे. बंदी असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. दुरुस्तसाठी किंवा नवीन जोडणीसाठी त्या कंपनीचे तंत्रज्ञ येऊ शकत नाहीत. कारण रस्त्यात पोलिसांनी अडवले तर काय असा त्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे ही सेवा अत्यावश््यक सेवेत असावी अशी मागणी होत आहे. पोलिसांनी तंत्रज्ञ लोकांना ओळखपत्र असताना सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आल्याची माहिती डेन केबलचे संचालक संजीव गुप्ता यांनी दिली. या बाबत नवी मुंबई पोलिसांनीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले तर या विषयी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले की, या बाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.