नवी मुंबई :  नुकत्याच झालेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमानंतर निवडणूक आयोगाने अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. यात नवी मुंबईत एकूण २६,८९१ मतदारांची वाढ झाली आहे. बेलापूर मतदारसंघात १०७२९, तर ऐरोली मतदारसंघात १६१६२ मतदारांची वाढ झाली आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महापाालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली होती. यात निवडणूक आयोगाने प्रथम छायाचित्र नसलेल्या मतदारांना छायाचित्र देण्याची संधी देत ज्यांची छायाचित्रे नाहीत त्यांचे नावे वगळण्यात आली. यात नवी मुंबईतील ५७ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली होती.

There is a possibility of a code of conduct for the upcoming Lok Sabha elections
पिंपरी: आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकांचीही धावपळ; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या कामांना मंजुरी
bjp meeting
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार!
Chahal, Bhide to be transferred after ECI orders
चहल, भिडे यांची बदली अटळ; राज्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली
transfer police officers Nagpur
नागपूर : निवडणूक आयोगाच्या आदेशाची पायमल्ली! तीन वर्षे पूर्ण पण अजूनही बदली नाही

हा कार्यक्रम पार पाडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबवला.  छायाचित्रे नसलेली वगळण्यात आलेली नावे व नवीन मतदार नोंदणी यांची यादी ५ जानेवारी रोजी जाहीर केली आहे. यात नवी मुंबईत २६,८९१ मतदारांत वाढ झाली आहे.

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमानंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात दोन्ही मतदारसंघांत मतदार वाढले आहेत असे  बेलापूर मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी सांगतिले.

वाढलेले मतदार

बेलापूर मतदारसंघ

            आधीचे       आताचे (२०२२)

पुरुष :       २०७११०        २१२८५७  

स्त्रिया :        १,७७५१०       १८२४९२

इतर :               १३            १३ 

एकूण :       ३८४६३३       ३,९५,३६२

ऐरोली मतदारसंघ

            आधीचे         आताचे 

पुरुष  :       २७६४४६        २८५ ३३३

स्त्रिया :        २०७२४३        २१४५१५

इतर :       ३६            ३९

एकूण :       ४८३७२५        ४९९८८७ 

राजकीय पक्षांचे बारीक लक्ष

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली होती. स्थानिक नगरसेवक प्रभागामध्ये नवीन मतदारांची नोंद करण्यासाठी राजकीय पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्य सरकारने बहुप्रभाग पद्धती आणली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलली असून निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यात मतदार वाढल्याने या नवीन मतदारांवरही राजकीय पक्षांचे बारीक लक्ष राहणार आहे.