नवी मुंबईत रविवारी (१९ जून) झालेल्या दोन अपघातांमुळे शीव पनवेल महामार्गावर खारघर ते कळंबोलीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यात कामोठे येथे ५ गाड्यांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी मुंबई कामोठे उड्डाणपुलावर रविवारी सकाळी आठच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. उड्डाणपुलावर बंद पडलेल्या ट्रकचे काम सुरू होते. त्याच वेळी मागून भरधाव येणाऱ्या व्हॅगन आर गाडी, इनोवा, एक ट्रक आणि एसटी महामंडळाची शिवनेरी बस एकमेकांवर धडकल्या. त्यात व्हॅगन आरमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

Fire Breaks Out, State Transport Bus, Gadchiroli, driver, conductor Prompt Action, Disaster, Prevent,
गडचिरोली : धावत्या बसने पेट घेतला; चालक व वाहकाचे प्रसंगावधान, प्रवासी…
new phase of Samruddhi Highway, bharvir, igatpuri, Monday
समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा सोमवारपासून सेवेत, आता इगतपुरीपासून थेट…
3 year old girl fall to death into a pothole on highway near titwala
टिटवाळ्याजवळ महामार्गाच्या खड्ड्यात पडून बालिकेचा मृत्यू
Jamtara Train accident
झारखंडच्या जामतारा स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, रेल्वेची १२ प्रवाशांना धडक, दोन जणांचा मृत्यू

कारमधील इतर सहप्रवासी व इनोव्हामधील प्रवासी असे तीन ते चार जण जखमी झाले आहेत. या जखमींवर जवळच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हॅगन आरमधील जखमींना बाहेर काढता न आल्याने शेवटी गॅस कट्टरने गाडीचा मोठा भाग कापून प्रवाशांना बाहेर काढावं लागलं.

हेही वाचा : साताऱ्यात वारकऱ्यांच्या ट्रॉलीला टेम्पोची धडक, एका वारकऱ्याचा मृत्यू, तर ३० जखमी

या शिवाय याच मार्गावर खारघर उड्डाण पुलावर एक ट्रक नादुरुस्त झाल्याने किरकोळ अपघात झाला. मात्र, सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. त्यातच पाऊस पडत असल्याने सर्वाधिक दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली.