नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंडियन स्वच्छता लिगमधील ‘ कचरा विरोधात लढाई’ या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. यावेळी राजीव गांधी मैदानात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पाहून या शहराचे स्वच्छता कार्य हे वाखाण्याजोगे आहे असे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले आहे. नवी मुंबई महापालिका आणि शहराने सन २०१५ पासून स्वच्छता कार्य हाती घेतले आहे. तेव्हा पासून नवी मुंबई शहराने आघाडी घेतली आहे.आजमितीला स्वच्छतेबाबत ज्या पध्दतीने नागरिकांमध्ये गांभीर्य आहे ते अतिशय वाखाण्याजोगे आहे .

या शहरात ज्या- ज्या घटकांनी स्वच्छतेत सहभाग घेतला आहे. विशेषतः आज तृतीय पंथी यांच्या कडून ही स्वच्छता करण्यात आली . नवी मुंबई शहरात ज्या पद्धतीने सर्वच स्तरातून स्वच्छता अभियानात सहभाग घेतला जात आहे. इतर ठिकाणी ही आशा पद्धतीने आदर्शवत स्वच्छता अभियान राबविले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. ओला सुका आणि घातक अशा तीन पद्धतीने कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून दिले जात आहे. त्याच बरोबर तरूणांना यामध्ये समाविष्ट करून स्वच्छता जागर करणे हे महापालिकेचे वेगळे अभियान आहे.

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन