२७ शेतकऱ्यांना २० लाख ४१ रक्कम अदा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई :  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा-बटाटा बाजार आवारात नाशिक आणि अहमदनगर येथील एकूण २७ शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा हा शेतमाल  मे. कादरी ट्रेिडग कंपनी गाळा क्र. ई-९९ यांच्याकडे विक्रीसाठी पाठवला होता. मात्र या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची विक्री रक्कम दिली नव्हती. त्यामुळे या संबंधित शेतकऱ्यांनी एपीएमसीकडे तक्रार केली होती. एपीएमसी प्रशासनाकडून त्या शेतकऱ्यांना त्याची २० लाख ४१ हजार थकीत रक्कम धनादेशद्वारे मिळवून देण्यात आली आहे. एपीएमसी बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव आणि कोणतीही फसवणूक होणार नाही या विश्वासाने एपीएमसी बाजारात शेतमाल विक्रीसाठी पाठविला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ नुसार शेतमालाची विक्री झाल्यानंतर २४ तासांत संबंधित व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना रक्कम अदा करणे बंधनकारक असते. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाची रक्कम न दिल्यास किंवा शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्यास त्याच्याविरोधात कारवाई करण्याचे अधिकार एपीएमसी प्रशासनाला आहेत. मात्र तरीदेखील आजही एपीएमसी बाजार आवारात शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. व्यापाऱ्यांकडून कित्येक शेतकऱ्यांची शेतमाल विक्री रक्कम थकवली जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrears onion growers recovery ysh
First published on: 15-01-2022 at 00:34 IST