scorecardresearch

Premium

पनवेल : अश्वमेध यज्ञामुळे समृद्धी, सद्भावना व मांगल्याची पुनर्स्थापना होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस

राज्यपाल रमेश बैस यांनी पर्यावरण आणि सामाजिक ऐक्याला धक्का लावणाऱ्या घटना घडत असताना अश्वमेध यज्ञाच्या माध्यमातून समृद्धी, सद्भावना आणि मांगल्याची पुनर्स्थापना होण्याला मदत होईल, असे प्रतिपादन केले.

Ashwamedha yagya
पनवेल : अश्वमेध यज्ञामुळे समृद्धी, सद्भावना व मांगल्याची पुनर्स्थापना होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

पनवेल – दिड महिन्यापूर्वी खारघर वसाहतीमधील कार्पोरेट पार्कच्या मैदानात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत अनेकांचे बळी गेले. रविवारी याच मैदानात साडेतीन हजार भक्तांच्या उपस्थितीत उष्माघात आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळून ४८ वा अश्वमेध महायज्ञानिमित्त आयोजित भूमीपूजन समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी पर्यावरण आणि सामाजिक ऐक्याला धक्का लावणाऱ्या घटना घडत असताना अश्वमेध यज्ञाच्या माध्यमातून समृद्धी, सद्भावना आणि मांगल्याची पुनर्स्थापना होण्याला मदत होईल, असे प्रतिपादन केले.

यावेळी राज्याचे मंत्री सूधीर मुनगंटीवार, देव संस्कृती विश्व विद्यालयाचे प्र-कुलगुरू चिन्मय पंड्या, अखिल विश्व गायत्री परिवाराचे संचालक मनुभाई पटेल, उद्योजक डॉ. निरंजन हिरानंदानी, राधिका मर्चंट, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. हरिव्दार येथील शांतीकुंजमधील अखिल विश्व गायत्री परिवार या संस्थेतर्फे २३ ते २८ जानेवारी २०२४ या दरम्यान खारघर येथील याच मैदानात लाखो भक्त ४८ व्या अश्वमेध महायज्ञ सामूहिक पद्धतीने करणार आहेत. यानिमित्त रविवारी हा भूमीपूजन समारंभ आयोजित केला होता. राज्यपाल बैस यांनी अश्वमेध यज्ञ हे केवळ धार्मिक अनुष्ठान नसून या यज्ञाचे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणविषयक आणि आध्यात्मिक महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

हेही वाचा – नवी मुंबई : मान्सूनपूर्व वृक्ष छाटणी सपशेल धूळफेक; वृक्ष उन्मळून पडले, तीन गाड्यांचे नुकसान

सर्व समाज एकत्र घेऊन हा यज्ञ करीत असल्याने यातून एकात्मतेची भावना वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जागतिक हवामान बदलामुळे देशभरात सुरू असलेल्या दुष्काळ आणि पूरस्थितीमुळे पर्यावरण व विकासाचा समतोल साधण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी राज्यपाल म्हणाले. विश्व कल्याणाच्या उद्देशाने अश्वमेध महायज्ञाचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी अखिल विश्व गायत्री परिवाराचे अभिनंदन केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ashwamedha yagya will help restore prosperity goodwill and harmony says governor ramesh bais ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×