उरण : पावसाळ्यात मासळीच्या प्रजननाचा कालावधी असल्याने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यासाठी खोल समुद्रातील मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाने बंदी घातली आहे. या बंदी काळामुळे उरणच्या करंजा व मोरा या बंदरावर शेकडो मासेमारी बोटी किनाऱ्यावर विसावू लागल्या आहेत. तसेच बोटीचे पावसापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत. तसेच मासेमारी जाळीही सुरक्षित ठेवण्यात येत आहेत. मासेमारी
बंदीचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने काढले असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

या बंदीमुळे ताजी मासळीची आवक घटणार आहे. तर स्थानिक मासळीच्या मागणीत वाढ होणार आहे. खवय्यांना सुक्या मासळीचा पर्याय खुला आहे. मात्र मागील अनेक वर्षांत मासळीची आवकच घटू लागल्याने सुक्या मासळीच्या दरातही प्रचंड वाढ झाली आहे. बंदी असल्याने दोन महिन्यांच्या काळात मत्स्य खवय्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. मत्स्यबीज उत्पादन आणि मासळीच्या प्रजननासाठी लागणारा कालावधी हा पावसाळ्यात सुरू होतो. पावसाळ्यातील जून व जुलै या दोन महिन्यांत विविध प्रकारचे मासे अंडी घालतात. त्यांनतर त्यांची पैदास होण्यास सुरुवात होते. या कालावधीत मासळीचे व मत्स्यबीज यांचे संरक्षण व्हावे यासाठी ही बंदी घातली जाते.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात

हेही वाचा – नवी मुंबई : एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या भूखंडांना रस्ता रुंदीच्या शुल्कात सूट

स्थानिक व किनारपट्टीवरील मासेमारांना काही नियमांचे पालन करीत मासेमारी करता येते. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने घातलेली बंदी व त्याचे नियम भंग केल्यास विभागाकडून कारवाई करण्यात येते. त्यामुळे नियमांचे पालन करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे.