उरण : सध्या थंडीची चाहूल लागली असून शुक्रवारी सकाळी काही प्रमाणात वातावरणात धुके होते मात्र दुपारी ३ वाजल्या नंतरही उरण शहर व परिसरात धुक्याचेच वातावरण दिसत होते. त्यामुळे हे खरंच धुकं आहे की, हवेतील वाढते प्रदूषण अशी शंका उरण मधील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या वातावरणात क्षणा क्षणाला बदल होत आहेत. याचा परिणाम मानवी जीवन आणि आयुष्यावर पडू लागला आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबईतील कांदळवनावर सीसीटीव्हीची नजर; वनविभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले असून १११ ठिकाणे निश्चित

69 villages in Vasai will get water from Surya project
वसईतील ६९ गावांचा पाणी प्रश्न मिटला; लवकर सुर्या प्रकल्पातील पाणी मिळणार
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली

यामध्ये लांबणारा पाऊस, वेळी अवेळी कधीही कोसळधार,उशिरा सुरू झालेली थंडी, कडक ऊन यामुळे कोणता ऋतु कधी सुरू होतो आणि संपतो याचा अंदाज येत नाही. अशीच काहीशी स्थिती सध्या उरण मधील वातावरणात दिसू लागली आहे. उरण मधील औद्योगिक परिसरात निर्माण होणारा धूर,रस्त्यावरील खड्ड्यामुळे होत असलेली धूळ याचाही परिणाम होऊन वातावरणात धुळीकणाचे प्रमाण ही वाढले आहे. दिवसभर धुरके वातावरण निर्माण होणे हे हवेतील प्रदूषणाचे लक्षण असल्याची शक्यता आहे. त्यामुळे उरण मधील हवाही आता प्रदूषित झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.