उरण शहर तसेच अनेक गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून विजेच्या या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बोकडविरा गावात मंगळवारी रात्री खंडित झालेली वीज बुधवारी सकाळी ९ वाजता आली. यामुळे शासकीय कार्यालये तसेच बँकांच्या कामकाजावरही परिणाम होऊ लागला आहे. तर दुसरीकडे व्यवसाय उद्योजकही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी उरणच्या नागरिकांकडून केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुवातीच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना ही नित्याची असली तरी पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटल्यानंतरही उरणमधील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मंगळवारी शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील तहसील, पोलीस ठाणे, बँका, झेरॉक्स दुकाने येथील कामकाजावर परिणाम झाला होता. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. तर बोकडविरा गावातील वीज रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास खंडित होऊन बुधवारी सकाळपर्यंत आली नव्हती. त्याचप्रमाणे उरणच्या पूर्व विभागातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक तास नागरिकांना विजेअभावी रात्र काढावी लागत असल्याची माहिती चिरनेरमधील सामाजिक कार्यकर्ते जीवन केणी यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens suffer due to power cut in uran amy
First published on: 05-08-2022 at 00:04 IST