मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला उरण- पनवेल तालुक्यातील गावातून जोडणाऱ्या साई गावाजवळील रस्ता खड्ड्यात गेला आहे. या मार्गामुळे अलिबाग व गोव्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे ३० किलोमीटरचे अंतर हे कमी होतो. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यात साई खारपाडा मार्गाला खड्डे पडले होते. सध्या पावसाळा जवळ जवळ परतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी या मार्गावरील साई येथील आर्शिया गोदामा जवळ खड्डे पडले आहेत.खड्ड्यातून लहान चारचाकी व दुचाकी वाहन चालविणे अवघड झाले आहे. पनवेल मार्गे कर्नाळा घाट टाळून ये-जा करणारी अनेक वाहने सध्या या मार्गाचा वापर करीत आहेत. मात्र याही मार्गात खड्डे असल्याने वाहन चालक व प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. इंधनाची बचत होण्याऐवजी खड्ड्यांमुळे अधिकचा वेळ जात असल्याची माहिती उरण मधील प्रवासी आशिष घरत यांनी दिली आहे. तसेच या मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Recovery of installments on Shiv-Panvel highway bus drivers associations statement to Deputy Commissioner of Police
शीव-पनवेल महामार्गावर ‘हप्ते वसुली’, बस चालक संघटनेचे पोलीस उपायुक्तांना निवेदन
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…
loksatta analysis two new roads between mumbai to goa
मुंंबई – गोवा दरम्यान लवकरच दोन नवीन महामार्ग… आणि १३ विकास केंद्रे… कसे असतील हे प्रकल्प?