नवी मुंबई – मुंबई मार्गे चेट डोंबिवली आणि कल्याणकडे जाणाऱ्या ऐरोली-काटई उन्नत मार्गाची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कामात अडथळा असलेल्या ऐरोली पोस्ट कार्यालयाजवळील दुसऱ्या उच्च दाबाच्या मोनोपोलो विद्युत टॉवरचे काम पूर्ण झाल्याने आता पुलाच्या पुढील कामाला वेग येणार आहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे ध्येय एमएमआरडीएने ठेवले आहे. मुंबईतून बेट प्रवासासाठी मे २०१८ मध्ये ऐरोली काटई उन्नत मार्गाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. पहिल्या टप्यात ठाणे- बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग (जोड) क्रमांक ४३.४३ किमीचा मार्ग बनवणे आणि दुसरा टप्पा ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्णवरील भारत बिजलीपर्यंत जोड रस्ता बनविण्याचे नियोजन करण्यात आले. करोनाचा कालावधीत रखडलेले काम त्याच बरोबर सिडको, वनविभाग आणि सीआरझेडची परवानगी, रेल्वे ट्रॅकवर गर्डरसाठी परवानगी, वृक्षछाटणी परवाना, खाडी-पूल विभागाचा परवाना अशा अनेक प्राधिकृत परवान्यांची कसरत पूर्ण करत ऐरोली-कटाई उन्नत मार्ग अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा