उरणमधल्या खोपटे व पागोटे येथील पाणथळ क्षेत्रांवर भराव घालून तेथील खारफुटी नष्ट केल्या जात आहेत. त्यामुळे येथील जैवविविधता ही धोक्यात आली आहे. या विरोधात पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पर्यावरणवाद्यांनी या भरावावर उभारल्या जाणा-या कंटेनर्सच्या पार्किंग लॉटविरुध्द आवाज उठवला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू; आज संध्याकाळी अंतिम लढत

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने एक ईमेल पाठवला आहे. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ रायगड जिल्हाधिका-यांना याचे निर्देश दिले आहेत. तसेच उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या खारफुटी आणि पाणथळ क्षेत्र समित्यांचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडे सुध्दा नॅटकनेक्टने स्वतंत्र तक्रार केली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : एमआयएम निवडणुकीसाठी सुसज्ज आयटी सेल उभारणार; प्रसंगी समविचारी पक्षांशी करणार युती

येथील १५० मीटर लांब आणि १५ मीटर रुंदीचा पट्ट्याला अवैधरित्या बुजवले गेले आहे. पार्किंगसाठी असे भराव टाकणे त्याचप्रमाणे अवैधपणे पैसे गोळा करण्यासाठी स्थानिक माफिया कार्यरत असल्याचे महाराष्ट्र लघु पातळी पारंपारिक मच्छिमार कामगार युनियनचे अध्यक्ष नंदकुमार पवार सांगितले.
अशाच पध्दतीने धुतुम येथे खारफुटीच्या मोठ्या पट्ट्याला बुजवून त्यावर पार्किंग लॉट बनवला आहे. या संदर्भात पर्यावरणवादी आणि स्थानिक मच्छिमारांनी वारंवार खारफुटींच्या नाशाविरुध्द, होणा-या गुन्ह्यांविरुध्द ऍलर्ट देऊन देखील क्षेत्रातील निरीक्षण यंत्रणा निष्फळ ठरत असल्याची खंत बी.एन. कुमार यांनी व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समित्यांच्या नियमित बैठका होत नसल्यामुळे आशा उल्लंघन करणा-या व्यक्तींना आणखीन खतपाणी मिळत आहे, कारण त्यांच्यावर कोणाचाही चाप राहिलेला नाही.

हेही वाचा- रायगड : द्रोणागिरी डोंगराला पुन्हा वणवा; वणवा की लावलेली आग?

खोपटे आणि पागोटे आंतरभरती क्षेत्रांना तात्काळ पाणथळ क्षेत्रे सूचित करुन, जैवविविधता व मच्छिमार समाजाच्या हितासाठी त्यांचे जतन केले पाहिजे असेही मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले आहे.