नवी मुंबईतील एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागली. दुपारी लागलेल्या या आगीवर चार तास झाले तरी नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. आगीत चार कामगार जखमी झाले असून त्यांना वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाणे, पावणे, महापे कोपरखैराणे वाशी ऐरोली या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आगीने रौद्र रुप धारण केलं कि, यात आसपासच्या आठ कंपन्यांना आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच आठ पैकी एक रबर कंपनी असून त्यात दोनच दिवसापूर्वी ८० लाखांचा रबर माल आणला गेला होता. या रबरामुळे आग विझली तरी वारंवार लागत आहे. त्यात हवेचा वेग कमी अधिक होत असल्याने आग पसरत आहे. रा सायनिक कंपनीतील छोटे मोठ्या पिंपाचे स्फोट होत आत.हे त्यामुळे या परिसरात जाण्यास बंदी करण्यात आली आहे. तसेच आसपासची कार्यालय रिकामी करण्यात आली आहेत. शुक्रवार असल्याने फारशी गर्दी नाही एवढीच चांगली बाजू. अशी माहिती नवी मुंबई मनपा अग्निशमन दलाचे मुख्याधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.