येत्या २ वर्षात पायाभूत सुविधा तसेच पाण्याची समस्या सोडवण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत उदयोजकांना दिले. बुधवारी ते लघु उद्योजक संघटना, एमआयडीसीकडून महापे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी एमआयडीसीचे उच्च पदस्थ अधिकारी तसेच लघु उद्योजक पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, मनपा आयुक्त राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा- पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षणच्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडरपदी दिलीप वेंगसरकर आणि गायक सागर म्हात्रे

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
trangenders, beggars,
पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Suresh Khade
सांगली : आंदोलनकर्त्या कामगारांना मंत्र्यांच्या मध्यस्थीने २०० कोटींची भरपाई

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी नवी मुंबईतील उद्योजकांसमवेत विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत लघु उद्योजकांच्या समस्या त्यांच्या अडचणी जाणून घेऊन तात्काळ संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना या समस्या सोडविण्यासाठीचे निर्देश देण्यात आले. आठवड्यातील दोन दिवस राज्यातील मोठ्या औद्योगिक वसाहतींना भेट देऊन समस्या जाणून घेणार व त्यावर उपाययोजना करणार असल्याचे उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा- यंदा नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाची दिवाळी गोड …..किती मिळणार सानुग्रह अनुदान !

एमआयडीसीमधील सर्व रस्ते दोन वर्षांमध्ये पूर्ण होतील. पाण्याच्या योजना एका वर्षामध्ये पूर्ण होतील. मलनिःसारण वहिनीसारखे विषय मार्गी लावले जातील, असे आश्वासन उद्योजकांना देण्यात आले. तसेच आयटी पॉलिसी फायनल केली आहे. आयटीमधील इंडस्ट्रियल सेक्टरला जास्तीत जास्त लाभ देण्याची भूमिका सरकारची आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रेझेंटेशन सादर केल्यानंतर एक चांगली आयटी पॉलिसी पुढे येईल आणि त्यातून आयटी उद्योग उभारी घेईल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.