नवी मुंबई : गेले आठ दिवस राज्यभर पाऊस सुरू असल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला बाजारात भिजलेल्या पालेभाज्यांची आवक होत आहे. या पालेभाज्या एका दिवसात खराब होत असल्याने ग्राहकांकडून मागणी कमी झाली आहे. त्यात आवकही कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. दहा ते २० टक्के दर वाढले आहेत.

एपीएमसीतील भाजीपाला बाजारात दररोज ५५० ते ६०० भाजीपाला गाड्यांची आवक होत असते. ही नियमित आवक कमी होत आता ४२४ गाड्यांवर आली आहे. त्यात पावसामुळे आवक होत असलेल्या भाजीपाला हा भिजलेला येत असून तो बाजारात येईपर्यंतच खराब होत आहे. ग्राहकांनी हा भाजीपाला खरेदी केल्यानंतर त्यांना त्याच दिवशी त्याची विक्री करावी लागत आहे. शिल्लक राहिल्यास हा भाजीपाला फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दरात १० ते २० टक्केपर्यंत वाढ करावी लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
Employer killed owner for non-payment of wages
ठाणे : मजुरीचे पैसे दिले नाही म्हणून मालकाची चाकू भोसकून हत्या

घाऊक बाजारात पुणे व नाशिक येथील पालेभाज्या आवक होत असून शुक्रवारी १,३९,००० क्विंटल कोथिंबीर, ३६,५०० क्विंटल मेथी तर ५२, ७०० क्विंटल पालकची आवक झाली.

पालेभाज्या दर

पालेभाजी            आधी             आता

कोथिंबीर             २०            ३० ते ३५

मेथी                    १०                  १५

पालक                 १५                   २५