मोरा ते भाऊचा धक्का जलप्रवास सुरळीत

उरण : मोरा बंदरातील चार कोटी रुपये खर्च करून एक लाख १८ हजार ९२७ क्युबिक मीटर साचलेला गाळ काढण्यात आला आहे. यामुळे समुद्राच्या ओहोटीमुळे बंद ठेवण्यात येणारी समस्या दूर झाली असल्याची माहिती मुंबई बंदर विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली. मोरा बंदरात साचलेल्या गाळामुळे मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक ओहोटीमुळे बंद करावी लागत होती. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. सातत्याने विस्कळीत होत असलेली उरण-भाऊचा धक्का प्रवासी लाँचसेवा सुरळीत करण्यासाठी महाआघाडी सरकारने मोरा बंदरातील साचलेला गाळ काढण्याला मे महिन्यांपासूनच सुरुवात करण्यात आली होती. ड्रेसिंग करून साचलेला गाळ काढण्याच्या कामासाठी चार कोटींची तरतूद करून निविदाही काढल्या होत्या. चार कोटी रुपये खर्चून मे महिन्याअखेरीस हे काम पूर्ण करण्याची मुदत होती.

police constable suspended for helping drug smuggler
अंमली पदार्थ तस्कराला मदत केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई
former director of agricultural produce market committee arrested in toilet scam
कृषी उत्पन्न बाजार समिती : शौचालय घोटाळा, एक माजी संचालक  अटक तर दुसऱ्याची चौकशी, एपीएमसीत खळबळ 
Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
Navi Mumbai Municipality, Palm Beach Road, Traffic Jams , sion panvel highway, Due to concretization, navi mumbai news, marathi news, road construction in navi mumbai,
काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी

त्यानुसार मोरा बंदरातील एक लाख १८ हजार ९२७ क्युबिक मीटर साचलेला गाळ काढण्यात आला आहे. मुदतीत गाळ काढण्यात आल्याने आता ओहोटीमुळे प्रवासी वाहतुकीला आता ब्रेक लागणार नसल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला असल्याची माहिती मुंबई बंदर विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली.