नवी मुंबई : गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच काठोकाठ भरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाच्या जलपूजनावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. पालिकेची परवानगी न घेताच नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांनी दोन माजी महापौरांसह मोरबे येथे जाऊन जलपूजन विधी उरकला. याला पालिका प्रशासनाने आक्षेप घेतला असून संजीव नाईक यांच्यासह तिघांवर घुसखोरीबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण २०२१नंतर प्रथमच १०० टक्के क्षमतेने भरले. धरणातील पाणीसाठा कमी असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईत पाणीकपात सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर धरण भरल्याच्या वार्तेने रविवारी शहरवासीयांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. महापालिका प्रशासनानेही धरणाचे जलपूजन करण्याचा निर्णय घेतला. त्याची तारीख सोमवारी निश्चित करण्याचेही ठरले. असे असताना माजी मंत्री व भाजप नेते आमदार गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक, पुतणे सागर नाईक तसेच समर्थक सुधाकर सोनावणे यांनी प्रशासनाला कोणतीही सूचना न देता रविवारी सकाळी मोरबे धरण गाठले. तसेच सुरक्षारक्षकांना प्रवेशद्वार उघडायला लावत या ठिकाणी जलपूजनाचा विधीही उरकून टाकला.

Nagpur municipal corporation
नागपूर : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उपद्रव शोध पथक सक्रिय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
dragon farming in konkan maharashtra dragon fruit farming
लोकशिवार : कोकणात ड्रॅगनची शेती
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Forest Minister Ganesh Naik Navi Mumbai MIDC
नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक, वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
Ganesh Naik talk about human and wildlife conflict and Solution plan
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले “वाघ मुंबईपर्यंत आले तर काय…”
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान

नाईक यांच्या या कृत्याबद्दल पालिकेच्या प्रशासकीय वर्तुळातून नाराजी व्यक्त होत आहे. पालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असून जलपूजनाबाबतचा निर्णय आयुक्तच घेऊ शकतात. तसेच संजीव नाईक आणि त्यांच्याबरोबरच्या नेत्यांकडे सध्या कोणतेही संवैधानिक पद नाही. असे असताना या मंडळींना धरणासारख्या संवेदनशील क्षेत्रात प्रवेश कसा मिळाला, असा प्रश्न रविवारी दिवसभर विचारला जात आहे.

या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने खालापूर पोलिसांना एक पत्र दिले आहे. संजीव नाईक यांच्यासह अन्य मंडळींवर धरणक्षेत्रात घुसखोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी अभियांत्रिकी विभागाने केली आहे. या ‘घुसखोरी’ची चित्रफीत असलेला पेन ड्राइव्ह आणि अन्य पुरावेही पालिकेने पोलिसांकडे दिले आहेत. खालापूर पोलिसांनी या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नसला तरी पालिकेने केलेल्या अधिकृत तक्रारीमुळे पोलिसांवर कारवाईसाठी दबाव वाढला आहे. 

 काँग्रेसची टीका

हे जलपूजन नियमबाह्यपणे करण्यात आल्याचे सांगत काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. बेकायदा जलपूजन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

आम्हाला सर्व नगरसेवक जलपूजनाला येणार असल्याचे वाटले. त्यामुळे आम्ही जलपूजनाला गेलो. पालिकेने बेकायदा जलपूजन केल्याबद्दल आमच्यावर कारवाई जरूर करावी; परंतु हीच तत्परता सामान्य जनतेच्या कामासाठीही दाखवावी. या घटनेचे राजकारण केले जात आहे. – सुधाकर सोनावणे, माजी महापौर

मोरबे येथे करण्यात आलेल्या जलपूजनाबाबत पालिका अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती घेतली जात आहे. पालिकेने खालापूर पोलीस ठाण्याला पत्र दिले असून मोरबे धरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनाही या प्रकाराबाबत खुलासा करण्याचे पत्र दिले आहे. सविस्तर माहिती प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. – राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Story img Loader