वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात सध्या भाज्यांची आवक वाढली असून दर गगडगडले आहेत. तरीदेखील बाजारात ग्राहक नसल्याने ३०% ते ४०% शेतमाल शिल्लक राहत आहे. अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. हेही वाचा- नवी मुंबई: ‘त्या’ वादग्रस्त आश्रम चर्चवर अतिक्रमण कारवाई; चर्चच्या फादरवर बाल लैंगिक शोषण प्रकरणी झाली होती कारवाई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे. नित्याने ५५०-६५० गाड्या भाजीपाला दाखल होत आहे. आवक वाढल्याने दर कमी झाले असून ग्राहक नसल्याने दरात ५०% घट झाली आहे. विशेषतः कोबी, वांगी, फ्लावर, वाटाणा, दुधी, टोमॅटो भाज्यांचे दर उतरले आहेत. मध्यंतरीच्या कालावधीत भेंडी ,गवार ,फ्लॉवर हिरवी मिरची ,शिमला मिरची , वाटाणा, वांगी या भाज्यांच्या दरात घाऊक तसेच किरकोळ बाजारात दरवाढ झालेली होती. आतामात्र घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढली असून देखील दरात घसरण झाली आहे, अशी माहिती भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली . गेल्या तीन दिवसांपासून बाजारात ग्राहक कमी असल्याने शेतमाला उठाव कमी आहे. त्यामुळे बाजारात गेल्या तीन दिवसांपासून दररोज ३०% ते ४०% भाजीपाला शिल्लक राहत असून खराब होत असल्याने फेकून द्यावा लागत आहे, असे मत भाजीपाला व्यापारी कैलास तांजणे यांनी व्यक्त केले आहे. हेही वाचा- पनवेलच्या खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा धडाका प्रतिकिलो दर (घाऊक दर) भाजी सध्याचे आधीचे कोबी ४-५ १६-२०फ्लावर ६-७ १८-२०वांगी ५-६ २८-३०कारली १४-१६ २४-२८हिरविमिरची १४-१६ ३४-४०दुधी १०-१२ २०-२४भेंडी १६-२० ३०-३२गवार ३०-३२ ४०-४४हिरवा वाटाणा ३६-४० ५०-६०टोमॅटो ८-१० १२-१४