नवी मुंबई जिल्हा काँग्रेसने आज केंद्रातील मोदी सरकार विरोधात वाशी येथे जोरदार आंदोलन केले. वाशी येथील एलआयसी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित येत मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. मोदी सरकारने एलआयसीला अदानी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप करत यावेळी मोदी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सरकार अदानी आणि अंबानी साठी काम करत असल्याचा आरोप करत मोदी सरकार हटावचा नारा देण्यात आला.

हेही वाचा- नवी मुंबई : खासगी शाळांची मैदाने झाली टर्फची मैदाने; तर पालिकेची खेळाची मैदाने दुर्लक्षित

chandrapur, Tension Erupts Teli Samaj prograame, Teli Samaj Felicitation progrrame, Congress Leaders Declare Support, Controversy Ensues, pratibha dhanorkar, chandrapur news, lok sabha 2024,
चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा
shivraj patil chakurkar, Dr archana patil chakurkar, latur, amit deshmukh, congress, bjp
शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक आनंदी

एलायसीमध्ये देशातील सर्वसामान्य व हातावर पोट असणाऱ्या नागरिकांनी एलआयसी मध्ये आपली बचत म्हणून रक्कम गुंतवली आहे परंतु याच सर्वसामान्य नागरिकांच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम आदानींच्या साहाय्याने मोदी सरकार करत आहे त्यामुळे या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वासघात केला आहे त्यामुळे अशा सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

हेही वाचा- उरण – पनवेल महामार्गावरील नादुरुस्त पुलाचे काम सुरू होणार ; तरुण आणि महिलेच्या मृत्यू नंतर सिडकोला आली जाग

देशातील मोठे उद्योगपती असलेल्या अंबानी व अदानी या समूहाच्या आडून मोदी सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांची लूट करत आहेत त्यांची फसवणूक करत आहेत त्यामुळे अशा फसव्या सरकारचा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आलेला आहे नागरिकांना या सरकारची दुसरी काळी बाजू पाहायला मिळत आहे, नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी दिली.