प्रथम पुनर्वसन, नंतर विकासकामे या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण : उरण तालुक्यातील बोकडवीरा ग्रामस्थांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सिडको व रेल्वेच्या विरोधात मंगळवारपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला असून प्रथम पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करा आणि नंतरच विकास कामे करून देऊ अशी भूमिका घेतली आहे. यासाठी काम बंद व बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. बोकडवीरा गाव हे सिडकोच्या नवी मुंबईच्या विकासाचाच एक भाग आहे. गावाच्या महसूल हद्दीत मोठय़ा प्रमाणात सिडकोची व रेल्वेची विकासाची कामे सुरू आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांच्या समस्या प्रलंबित आहेत. यासंदर्भात सिडकोसोबत वारंवार चर्चा होऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. यामध्ये प्रामुख्याने उरण ते बेलापूर रेल्वे मार्गात येणाऱ्या बोकडवीरा रेल्वे स्थानकाच्या आराखडय़ात येणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची राहती घरे कायम ठेवावीत, अशीही मागणी केली जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rehabilitation agitation villagers development work ysh
First published on: 25-01-2022 at 00:02 IST